आर्थिक पॅकेज न देता पुन्हा लॉकडाउन लागू केला तर मोठ्या उद्रेकाचा सामना करावा लागेल
अकोला : रोजंदारी मजुरांना आणि मध्यमवर्गाला अठरा पगड जाती बारा बलुतेदार बँड पथक शेतकरी-शेतमजूर छोटे दुकानदार मध्ये काम करणारे कामगारांना आर्थिक पॅकेज न देता पुन्हा लॉकडाउन लागू केला तर महाराष्ट्राला मोठ्या उद्रेकाचा सामना करावा लागेल, असा इशारा भाजपा भारतीय अध्यक्ष रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी पुनः च्छ लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. उद्धवजी महा विकास आघाडी सरकार ने हा काही कोरोनाचा उपाय नाही. गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडी सरकार कोविडची हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात अपयशी ठरलं आहे. याचा परिणाम असा झाला की जेव्हा महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला बेड व व्हेंटिलेटरची कमतरता दिसून येते. रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. आपण एक नारा दिला होतात, माझं कुटुंब माझी जबाबदारी… मी जबाबदार.. होय उद्धवजी महाराष्ट्राच्या जनतेला बेड्स ची कमतरता दिसून येतेय तर त्याची जबाबदारी व महाविकासआघाडी ची आहे. तरीही आपल्याला जर लॉकडाउन लावायचे असेल तर आमचे रोजंदारी मजूर, आमची मिडल क्लास फॅमिली तसेच 18 पगड जाती बारा बलुतेदार शेतकरी शेत्मजुर तसेच छोट्या दुकानदार मध्ये काम करणारे कामगार यांची खाण्यापिण्याची, औषधांची व्यवस्था करून, त्यांना एक आर्थिक पॅकेज देऊन मगच हा लॉकडाऊन लावा. नाहीतर महाराष्ट्राला एका मोठ्या उद्रेकाला सामोरं जावं लागेल. आणि त्याची पूर्ण जबाबदारी उध्दवजी व महा विकास आघाडी असेल. असा जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी इशारा दिला.
महिनाभरात जिल्ह्याबाहेरील ३६ कोरोना रुग्णांचा मृत्यू
वरिष्ठ अधिकाऱ्यांना सह आरोपी करण्याची वंचितचि मागणी